Tuesday, November 20, 2012

शासनातील वै.अ.द्वेष्टे बोरुबहाद्दर हटल्याशिवाय वनवास संपणार नाही!

                शासनातील वै.अ.द्वेष्टे बोरुबहाद्दर हटल्याशिवाय वनवास संपणार नाही!

        नुकताच पदव्युत्तर पदवी/पदविका धारक वै .अ. यांना अनुक्रमे ३ व ६ वेतनवाढी अधिकच्या देण्याविषयीच्या शासन निर्णयातील जाणीवपुर्वक  ठेवण्यात आलेल्या संदिग्धतेच्या दुरुस्तीचा MAGMO च्या अथक प्रयत्नाने १९/११/२०१२ रोजी शा.नि.निघाला. त्यात परत अश्या मेखा  मारल्यात कि  वै. अ. ला सरळ सरळ फायदा होवूच नये. अनेक पदव्युत्तर वै.अ.  यांना या लाभा पासून कसे दूर  ठेवता येईल ते ``कटाक्षाने` पाहण्यात आलेय; हे शा.नि.ची भाषा बघूनच  लक्षात येईल..








यात त्यांनी
 १.`संविधिक विद्यापीठाची ` शब्द घालून समस्त CPS किंवा DNB  पदव्युत्तर धारक वै. . यांना हा लाभ मिळण्यापासून वंचित केले आहे. 

    २,दुसरी मेख अशी कि `चिकीत्सा विशेषज्ञ `अर्थात केवळ CLINICAL PG  वाल्यांनाच हा लाभ NONCLINICAL PG वाल्यांना हि लाभ मिळण्यापासून दूर ठेवण्याची व्यवस्थित सोय करण्यात आली आहे.
   
३.केवळ १४/१२/२०११ रोजी १५६००-३९१०० ग्रे.पे.५४०० या वेतन श्रेणीवर कार्यरत वै.अधिकाऱ्याना ते त्यानंतर वरच्या श्रेणीवर पदोन्नत झालेले असले तरी ह्याचा लाभ मिळणार म्हणजे १४/१२/२०११ पुर्वीपासून  वरिष्ठ वेतनश्रेणीच्या कोणाही वै. अ. /अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांना लाभ नाही घेता येणार ! 
       तसेच १४/१२/२०११ नंतर येणाऱ्या नवीन वै.अ. अस्थायी ना लाभ द्यायचा कि नाही याबाबत स्पष्ट उल्लेख ना करून स्थानिक कारकुनांना यावरही विनाकारण वाद घालून वै.अ.ना छळ्ण्याची सोय करून दिलीय! तसे सर्व नवीन आणि अस्थायी वैद्यकीय अधिकारी या लाभासाठी निर्विवाद पात्र आहेत असाच अर्थ आहे.
   
 हा सर्व प्रकार केवळ हा GR पुरता सीमित नाही प्रत्येक बाबतीत वै.अ.संबंधीत पत्रोव्यवाहारात हा छळ गुप्त लाक्षागृह रचला जातो.हे खुप घातक आहे.

 मुळात वै. अ ना काहीं द्याचं असे अजिबात वाटत नाही.केवळ आंदोलनाचा रट्टा होता म्हणून नाविलाजाने काहीं बाबी बळेच कराव्या लागतायेत असे दिसते.
          वास्तविक पाहता शासकीय सेवेत डॉक्टर आकर्षित करण्यासाठी व आहेत ते डॉक्टर टिकवण्यासाठी इतर राज्य डॉक्टरांच्या प्रश्न कडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन त्यांची आरोग्य व्यवस्था सुधारत आहेत पण महाराष्ट्रात  बाबू लोकांना `आम्हाला काय त्याचे` भले रिक्त राहो/ पडे व बुडो खाते आम्ही ह्या डॉक्टरना छळण्याचा वसा घेतलाय ! आरोग्यमंत्री सचिव ह्यांना जबादारीची जाणीव आहे त्यांना लोकांना उत्तरे द्यावी लागतात त्यामुळे ते वै अ चे प्रश्न सोडवून खाते सुधारण्यचे दृष्टीने धडपडताना दिसतात पण मंत्रालयातील काहीं झारीतले शुक्राचार्य ज्यांना काहीही देणे घेणे नाही ते वै. अ.छळण्याचे काम कौशल्याने वा नेटाने करतायेत.ही बाब तुम्ही  शासनाचे वै. अ. संबंधी  निघणाऱ्या जी. आर. कडे,पत्रांकडे,परीपत्रकांकडे  त्याच्या भाषेकडे नुसती नजर टाकली तरी लक्षात येईल! मग ते जी आर असोत किंवा pool  sms पत्रक असो , वा गावभेट कार्यक्रम पत्रक असो वा आणखी काही .त्यात वै. अ. ह्यांच्या अडचणीचे सोडा साधी व्यवहार्यता सुध्दा पहिली जात नाही , केवळ छळ हाच उद्येश दिसतो.   
                     गेल्यावर्षभरात महत्वाचे केवळ २ दोन जी आर बाहेर पडलेत . एक  पी . जी. वै. अ साठी  ३ वा ६ वेतनवाढींचा, दुसरा आताचा NPA चा , काय भाषा आहे त्या जी आर ची देणे कमी अन अटी जास्त! अटी ही अश्या कि त्या वै अ ला वाटावे ``का मागीतालेबुवा आपण हे उगीच`` असा वाटावे . इतके अपमानित करणारे गुलाम सारखे.     दोन जी आर! पण एकाची ही आतापर्यंत अंमलबजावणी करता येऊ शकत नाहीं अशा त्रुटी ठेऊन नंतर प्रत्येक जी आर ला  दुरुस्ती करावी लागावी त्यासाठी परत  लढा ! काय चाललाय हे? हेतुपुरस्सर मंत्रालयातील कोणी बाबू/कारकून ग्रुप हा कायम वै . अ .च्या विरोधातला आहे हे नक्की;कारण ह्यापूर्वीही NPA चे जी आर निघालेत त्याची भाषा अशी नव्हती.इतर खात्यातील  जी आर कसे सरळ सरळ आणि सुस्पष्ट असतात . नेमके आपलेच जी आर  संदिग्ध , अन्याय कारक आणि जणू नाविलाजाने देतोय तेही गुलामासारखे कसे?ते ही सहज घेता येऊ नये ह्याची सोय करणारी drafting करणारे अधिकारी कर्मचारी हेच  वै.अ. चे खरे शत्रू आहेत.         
               आरोग्यमंत्री वा सचिव ह्यांना अशी अडवा अडवी अन्याय नक्कीच अभिप्रेत नसावी.परंतु ही बाबू मंडळी वै. अ.च्या   पर्यायाने आरोग्य खात्याच्याच मूळावर उठली आहे. अश्याने डॉक्टर  मंडळी शासकीय सेवेत कसे आकर्षित होणार आणि आहे ते डॉक्टर कसे टिकणार?  नेहमीच ही nonmedical nontechnical कारकून/अधिकारी मंडळी शालेय-महाविद्यालय जीवनापासून आपण डॉक्टर न झाल्याचे शल्य आणि सोबतचे मित्र डॉक्टर झाल्याने  तथाकथित रित्या हे त्याच्यासमोर कमी बुद्धीचे ठरल्याने  ह्यांचा अहं दुखावल्याची भळभळती  जखम आयुष्यभर अश्वथाम्याप्रमाणे ऊरात बाळगून असतात त्यामुळे आपसूकच शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रूपाने एक  डॉक्टर त्यांच्या बालपणापासून जपलेल्या शल्यासाठी वा असुयेसाठी सूड उगवण्यासाठी तावडीत सापडतो. मग ते असा छळ करून असुरी आनंद घेतात.वास्तविक पाहता  बुद्धीचे वा प्रतिभेचे मूल्यमापन केवळ डॉक्टर इंजिनिअर होण्याने केले जाऊ शकत नाही.असो.         
                  अश्या पार्श्वभूमीवर अश्या लोकांकडे माग्मोच्या अनेक मागण्या पडून आहेत! एकूण १५-२० प्रमुख मागण्या आहेत .
    सगळे हवाल दिल आहेत, सगळ्याची दिवाळी बेचैनीत गेलीय, अस्थायी तसेच, २००९ सेवासामावेषित पूर्वलक्षी लाभ वाले तसेच, BAMS GROUP B  चे GR .A  आकांक्षित तसेच, इ.इ.. १५-२० मागण्यावाले  हवालदिल मनाने  शुभ संदेशाची वाट पाहत बसलेत.आत्ता त्यात THO च्या अस्थिरतेची भर पडलीय.
जेथून आपल्या कल्याणासाठीच्या GR निघतात त्या गंगोत्रीतच हे असे वै.अ.द्वेष्टे बोरुबहाद्दर बसलेत तो पर्यंत आपला वनवास संपणार नाही ह्याची खुणगाठ बांधून ठेवा. काम आणखी जिकीरीचे होऊन बसलेय , MAGMO ची धडपड,सगळे  कष्ट व मेहनतीवर  हे बोरुबहात्तर सगळ्यावर  असा अंतिम टप्प्यावर घात करून छळणार हे नक्की.

Tuesday, November 13, 2012

देख के दुनिया कि दिवाली दिल M.O .का चुपचाप जला !

                         देख के दुनिया कि दिवाली दिल M.O .का चुपचाप जला !



        काहीं महान साहित्यकार/कवी खरच किती दूरदृष्टिचे आणि व्यापक विचार मांडायचे.आजपासून बरोबर ५० वर्षापूर्वी 1962 साली ``हरियाली और रास्ता`` चित्रपटातील महान गीतकार/कवी शैलन्द्रजी चे हे गाणे पहा; 
शब्द न शब्द  आजच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या स्थितीचे चपखल वर्णन करतात, हृद्य मन पिळवटून टाकतात ते शब्द!

      आज वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोणताही संवर्ग  सुखी समाधानी नाही.मुलभूत अधिकारापासून वंचित अन्याग्रस्त ! त्याच्या स्वप्नाचा चक्काचूर  झालेला, विमनस्क दुभंगलेल्या मनाचे ओझे वाहणारा!सतत अनिश्चिततेच्या खायीत लोटलेला अशा m.o.च्या ह्या दिवाळीत चपखल वर्णन करणारे हे गाणे पहा ऐका.!

                                               ``किस्मत का है  नाम मगर काम ये  दुनियावालों का 
                                          फूंक दिया है चमन हमारे ख्वाबों और ख्यालों का 

                                       जी करता है खुद ही घोट दे अपने अरमानों का गला 

                                               देख के दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला . 
                                      लाखों तारे असमान में एक मगर ढूंढे न मिला !``

वाह! शैलेन्द्रजी,मुकेशजी आणि शंकर जयकिशनजी !!