लोकोहो! वैद्यकीय अधिकारी वेठबिगारी गुलाम नाही!
नुकतेच बुलढाणा जिल्हात लोकमतच्या वार्ताहर पत्रकार महाशयांनी तथाकथित स्टिंग ऑपरेशन केले. रविवारी सुट्टीच्या दिवशी डमी रुग्ण विविध प्रा केंद्रावर पाठवून किती `दवाखाने` चालू होते आणि तेथे कोण कोण होते , काय केले ते वृत्त दिले आहे.कुठे `दवाखाना` बंद होता , कुठे ओ.पी.डी . बंद होती कुठे एक दोन च कर्मचारी होते , कुठे कुठे डॉक्टर होते/नव्हते, कुठे डॉक्टरांनी तपासले, कुठे रेफर केले इ.इ.इ.वरून ह्या पंडितांनी सांगितले २४ तास सेवा देण्यासाठी `निवासी वैद्यकीय अधिकारी नेमलेत शासनांनी ` तेही दोन दोन! हेही नमूद केले .एकूण ते वृतांकन वाचले कि हसावे कि रडावे ,असे झाले .
डोके फोडून घ्यावेसे वाटते! वीट आलाय ह्या अडाणी पत्रकार, नेते, कार्यकर्ते, अधिकारी आणि आपल्यातील हि काहीं अडाणी अधिकारी डॉक्टर ह्यांचा! ह्यांना कोणीतरी सांगा हो
. `प्राथमिक आरोग्य केंद्र हे दवाखाने नाहीत`
. तिथे २७ आरोग्यानिर्देशाकावर प्रतिबंधात्मक सेवा दिली जाते उद्दिष्टे असतात, अनेक आरोग्य कार्यक्रम राबविले जातात,
. प्रत्येक कार्यक्रमाची रचना कार्यपद्धती आहे .
. नियमितपणे त्याचा अहवाल , आढावा ,बैठकात कीस पडला जातो एकेका उद्दिष्टावर,खरडपट्टी,शिक्षा इ.मरणप्राय यातना वै.अ. भोगत असतो प्रा आ. केंद्रावरचा!
. हे अडाणी तोंडवर करून ग्रामीण रुग्णालये जिल्हा सामान्य रुग्णालये खाजगी रुग्णालयासारखे ``रुग्ण तपासणी निदान उपचार` एवढ्यावरच निघाले प्रा आ.केंद्राचे मुल्यामापन करायला!
बाबानो! तुम्ही समजता तसे प्रा आ केंद्रे दवाखाने नाहीत! इथे प्राथमिक उपचार/प्रथामोचारच अपेक्षित आहे ,इथे तशीच यंत्रणा असते,तेवढच मनुष्यबळ ,तेवढेच साधनसामुग्री असते तिथे.ह्यात कामचुकार चुकीचे आसे काही नाही.कधी समझुन घेणार तुम्ही आम्हाला!
वैद्यकीय अधिकारी त्याला नेमून दिलेल्या कामा पेक्षा आरोग्याकेंद्रावर कोणीही भेट देतो आणि ``डॉक्टर नाहीत ``ह्याच तक्रारीने वैतागून गेलाय, दहशतीत जगतो.जगात हि कोणी वर्षाच्या बारा महिने नेहमी २४ तास कामावर असेल का?घरसंसार , बायका पोरे , सोडा मनुष्याला अत्यावश्यक असलेली झोप, भोजन , नैसार्किक क्रिया ला तरी वै.अ.ला २४ तास पैकी काहीं तास तरी नितांत गरजेचे असतील न , तो माणूस नका समझू पण एक सजीव प्राणी तरी आहे न!! मग २४ तास कामावर असतो हे कोणत्या आधारावर म्हटले जाते ?
वैद्यकीय अधिकारी त्याला नेमून दिलेल्या कामा पेक्षा आरोग्याकेंद्रावर कोणीही भेट देतो आणि ``डॉक्टर नाहीत ``ह्याच तक्रारीने वैतागून गेलाय, दहशतीत जगतो.जगात हि कोणी वर्षाच्या बारा महिने नेहमी २४ तास कामावर असेल का?घरसंसार , बायका पोरे , सोडा मनुष्याला अत्यावश्यक असलेली झोप, भोजन , नैसार्किक क्रिया ला तरी वै.अ.ला २४ तास पैकी काहीं तास तरी नितांत गरजेचे असतील न , तो माणूस नका समझू पण एक सजीव प्राणी तरी आहे न!! मग २४ तास कामावर असतो हे कोणत्या आधारावर म्हटले जाते ?
प्रा.आ.केंद्रावरील .वैद्यकीय अधिकारी ह्यांच्या बद्दल `कामावर २४ तास ``पडून ``राहण्याचा` हा संतापजनक गैरसमज आपल्यामुळे आणि आपल्या अधिकाऱ्यामुळेच पसरलाय,
आम्ही कधी सर्वाना सांगितलेच नाही आग्रहपूर्वक ,
# अधिकारी त्यांच्या काळे धंद्यामुळे लोकप्रतिनिधी/ पत्रकार पुढे बोटचेपेपणामुळे कधीच ह्या लोकांना आरोग्य खात्याच्या यंत्रणेबद्दल,संरचनेबद्दल , मुनुष्यबळ ,साधन सामुग्री , कार्यप्रणाली, त्यांच्या कामाबद्दल खरे व पूर्ण वास्तव सांगतच नाहीत.त्यांना वाईटपणा आणि लोकांच्या मनात चुकीने प्रचलित मताला विरोध करणारा अगाउपणा अंगावर घेऊन आपल्या भानगडी काढून घ्यायच्या नसतात किंवा गोड बोलून हं ला हं करून पदावर चिकटून राहायचे असते.
# आणि आम्ही स्वतः पण कधीच लोंकाना आपल्या सम्पर्कात येणाऱ्यांना आपल्याच कामाबद्दल खात्याच्या संरचनेबद्दल बोलत नाही.सागत नाही , आग्रही राहत नाही.कारण .. पहिल्यांदा स्वतः लाच ज्ञान नसते,माहिती नसते , माहिती करून घेण्याची तसदी घेतली जात नाही, ज्ञान असेल तरीही कुठे कुणाला सांगावे जाऊ दया ;केवळ मुक्तपणे अन्याय सहन करणे, जे कोणी लाथाडत जातील अपमान करतील चुकीचे वागतील , अन्याय करतील ते गुमानपणे सहन करीत राहतो . ह्या मूळेच इतकी आपली वाताहत जाहली आहे.
प्रा.आ.केद्रावरील .आरोग्य खाते जगातील एकमेव खाते असेल ज्याच्याबद्दल `नेमके काय करतो` हे जनतेच्या इतक्या जवळ राहून सुद्धा कोणाला हि म्हाहित नाही!
सर्वजण हे `दवाखाने`आहेत आणि इथे २४ तास डॉक्टर आहे `इलाजासाठी`असतो आणि असलाच पाहिजे , असेच समजतात!
जनताच काय, अहो आपल्यातले डॉक्टर मग जे सेवेत नाहीत तेही आणि जे प्रा अ केंद्रशी संबधित नाही ते हि , प्रा.आ. केंद्रावर चालणाऱ्या ``उपचार` इलाजीचीच ` मूर्खपणे मूल्यमापन अन चर्चा करतात.
साधी गोष्ट आहे जर सर्व प्रा आ.केंद्रावर २४ तास सेवा उपलब्ध्द असणे अपेक्षित आहे तर मग वेगळे २४X ७ ह्या २४ तास सेवा देणाऱ्या phc का निर्माण केल्या गेल्या?
ह्याचा अर्थ सर्व phc २४ तास बाळांतपणासाठीच्या सेवा सुद्धा अपेक्षित नाहींत!
कर्मचारी/ वै .अ. देतात २४ तास जर सेवा देताहेत तर देऊ द्यात २४ तास बिनबोभाट खपताहेत , मरताहेत आणि वरून बेचारे घाबरून भेदरलेले अपराधीपणे राबताहेत तर राबू द्या, हा भ्रम पसरवण्यात आपले अधिकारी आणि आपणच कारणीभूत आहोत.
आता बुलढाणा जिल्ह्यातील वै. अ.ना हि चागली संधी आहे ह्या बाबी उघड करायची ,मांडायची ह्या लोकांपुढे,सांगा ठामपणे. नेते कार्यकर्ते पत्रकार ह्यांना यानिमित्ताने आत्ता करा साक्षर थोडेसे आरोग्य खात्याबद्दल
म्हणा त्यांना. `` चला देऊ २४ तास सेवा, तुम्हीच सांगा किती तास काम करणे अपेक्षित आहे, शेतात शेतमजूर, वेटर,सुधा ८ तासाच्या वर राबत नाही, मग २४ तास सेवा देण्यासाठी एका आरोग्य केंद्रावर किमान किती डॉक्टर लागतील?किती आहेत? का नाहीत तेवढे? तुमीच सांगा ? ``
कारण तिथे तुम्ही समजता तसे आरोग्य सेवे प्रदान करणारी हि संरंचना स्वीकारली तेंव्हा इतक्या जुजबी मनुष्यबळ व साधन सामुग्रीवर तिथे उपचारात्मक २४ तास सेवा देणे अपेक्षित नाहीच मुळी ! करताहेत न , चाललेय न तर चालू द्या असे आहे...
२४ तास कामावर हा वेठबिगार गुलाम असतो आणि वेठबिगारी कायद्याने गंभीर गुन्हा आहे!
संतापजनक बाब हि कि आम्ही ज्या सेवेसाठी / कामासाठी आहोत , त्या कामाचा सविस्तर आढावा दर रोज , आठवडी ,मासिक , विविद बैठकातून घेतला जातो खरडपट्टी काढून जगणे मुश्कील करून ते करून घेतले जाते आणि बाहेर आमचे मूल्यमापन त्या कामावरून नाही तर दुसऱ्याच कामावरून होते!
हे असे झाले सोनाराकडे जाऊन तू किती फास शेवटल्या? किती धावा जोडल्या? किती खुरपे कोयते केले?काहीं नाही?केली असेल एखादी कधी तरी ?
मग तुझा काय कामाचा हा हातोडा,भाते , ऐरण ?
सोनाराने हथोडी आहे म्हणून कधी कोयता सरळ करून दिला , खुरपे बडवून दिले तर त्याचे ते मुख्य काम होत नाही , आणि लोहाराच्या कामावरून सोनाराच्या कामाचे मूल्यमापन होऊ शकत नाही आणि ते करणे हि मूर्खपणाचे आहे!
प्रतिबंधात्मक सेवेसाठी असलेल्या यंत्रणाचे मूल्यमापन उपचारात्मक सेवा बघून करता येत नाही आणि तसे करणे मूर्खपणाचे आहे.
मुळात आपल्या देशात आरोग्य सेवा प्रदान करणारी थ्री tier संरंचना स्वीकारली.
त्यात दोन भाग एक उपचारात्मक भाग आणि दुसरा प्रतिबंधात्मक भाग ,
१.ग्रामीण रुग्णालये (RH /cottage hospi .community health centrs ),उपजिल्हा रुग्णालये (SDH ),जिल्हा सामान्य रुग्णालये(DIST सिविल HOSPITALS ),वैद्यकीय महाविद्यालये रुग्नाये ,विशेष रुग्णालये इ मार्फत प्रामुख्याने उपचारात्मक सेवा दिल्या जातात , ज्या लोकांना आरोग्य विभाग म्हटले कि हेच अभिप्रेत असते .ज्यात रुग्ण ,तपासणी निदान उपचार हा भाग आहे . हा आरोग्यसेवेचा दृश्य दिसणारा भाग /काम आहे .
२.आणि प्रामुख्याने जिल्हा परिषदे मार्फत संनियान्त्रित प्रा आ केंद्र त्या अंतर्गत उपकेंद्रे मार्फत प्रामुख्याने प्रतिबंधात्मक सेवा दिल्या जातात .
हा आरोग्यसेवेचा अदृश्य भाग हे सर्सामान्यपणे लोंकाना न दिसणारा भाग आहे , प्रचंड काम आणी प्रचंड महत्वाचे ज्यावर देशाशी पत ठरते!
कोणताही देशची पत त्या देशाची जन्म दर ,मृत्यू दर,अर्भक मृत्यू दर , माता मृत्यू दर ,जीवन निर्देशांक , , रोग निर्मुलन स्थिती यावरून ठरते !
WORLDBANK देशाला कर्ज देताना किती रुग्ण तापसले जातात किती उपचार केले जातात ह्यावरून पत नाही ठरवत तर त्या देशाच्या जन्म /मृत्यू दर , अर्भक मृत्यू दर , माता मृत्यू दर , आरोग्याद्यायी पाणीपुरवठा इ निर्देशांकावरून ठरवते! ह्याचा अर्थ उपचारात्मक सेवेचे महत्व कमी नाही . परंतु ह्यादोन प्रकारच्या सेवा त्यांची कार्य पद्धतीत गफलत करून अन्याय होतो.
जगातून देविरोग निर्मुलन झाले , कित्येक रोग निर्मूलनाच्या वाटेवर ,कित्येक रोग हे इतिहास जमा झालेत नारू , घटसर्प , डांग्या खोकला , कुष्ट रोग ,धनुर्वात, प्लेग ,पटकी इ.कित्तीतरी रोग दुर्मिळ झालेत , पूर्वी गावच्या गावे ओस पडायचे,आता ती परिस्थिती का नाही ,का झालेत? आमच्या आधीच्या पिढ्यातील आमच्यासारख्या वै.अ. आणि आरोग्य कर्मचार्यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक सेवेमुळे हा चमत्कार झालाय आणि पुढे हा महान वसा आम्ही चालावातोय म्हणून आज साथी चे रोग , कित्येक रोग समाजातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
हि प्रतिबंधात्मक सेवा योजनाबद्ध रित्या , विविध आरोग्य कार्यक्रमाच्या स्वरुपात नित्यनियमित राबविली जाते त्याचा आढावा घेतला जातो , कामाची उद्दिष्टे दिली जातात तेवढे काम करावेच लागते , पण हे पडद्यामागचे नाट्य कष्ट जनतेला न नेते कार्यकर्ते व पत्रकारांना दिसतात अन आम्ही कधी सांगितलेय.ते आमच्या मुख्य प्रचंड प्रतिबंधात्मक कामा व्यतिरिक्त `डॉक्टर आहेच तिथे तर द्या प्राथमिक उपचारात्मक सेवा ह्या भावनेने चालू ठेवलेल्या छोट्याश्या उपचारात्मक` सेवेवरूनच आमच्या कामाचे मूल्यमापन करतात .आणि ९९% काम हे प्रतिबंधात्मक हेसमोर येतच नाही.
नेमके कोणते काम पाहिचे असेल तर आमच्या गावोगावी असलेल्या नर्स ANM किंवा आरोग्य कर्मचारी MPW ह्यांचा अहवाल प्रत वाचली तरी भली मोठी यादी लक्षात येईल.
ह्यावरून गरज आहे ती आम्ही सर्वांनी ठामपणे सर्वाना हे सांगण्याची ,माहिती देण्याची ,
लोंकाना ग्रामीण भागात खरच २४ तास उपचारात्मक सेवेची गरज आहे. तशी यंत्रणा सरकारने निर्माण केली पाहीजे . तेवढे डॉक्टर, कर्मचारी,औषधी, साधने उपलब्ध केली पाहिजेत.
प्रतिबंधात्मक सेवेसाठी असलेल्या यंत्रणेला उपचारात्मक सेवेसाठी दाखवून गोरगरीब ग्रामीण जनतेची बोळवण करणे; हेही जनतेची शुद्ध फसवणूक आहे.
दुसऱ्याच्या बारश्याच्या समारंभात गरजू मित्राचे लग्ने उरकून घेणे थांबवले पाहीजे ! बारश्याच्या व्यवस्था ती काय असणार आणि लग्न कसे पार पडणार!
बारसे बारश्यात ! लग्न ,लग्नात ! दोघांची सरमिसळ करून दोन्ही कार्याची वाट लागेल!
http://www.youtube.com/watch?v=x88r7JI4ljU&playnext=1&list=PL73EC7AE9434AC81B&feature=results_video
भय इथले संपत नाही......
http://www.youtube.com/watch?v=x88r7JI4ljU&playnext=1&list=PL73EC7AE9434AC81B&feature=results_video
भय इथले संपत नाही......