Sunday, June 9, 2013

अंजन

                                                            अंजन 
  

मित्रहो ! आपण सर्वजण एकाच जहाजातील प्रवासी आहोत. संघर्ष struggle for existence हा आपल्या यशाच्या शोधातला नव्हे नित्य जगण्याचा अत्यावश्यक,अविभाज्य आणि परिणाम कारक अमोघ शस्त्र आहे!    

        पण त्यासाठी असायला हवी एकतेची भक्कम अभेद्य अशी वज्रमूठ,वेळ आलीच तर प्रतिकूल परिणाम एकसाथ सगळ्यांनी भोगण्याची,त्यागाची तयारी!आंदोलन, तीव्र, संघर्ष, संप अशी भाषा काही आपले आगतिक मित्र करत असतात,पण प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केल्यास काय चित्र आहे ते आपले आपणच पहा,         

    प्रा. आ. केंद्र वै. ,ग्रा. रु.,सामान्य रु. mbbs, bams bonded,mkcl ,mpsc ,समावेशित ,अस्थायी आणखी किती तरी … अघोरी वर्ण व्यवस्थेत तरी चारच वर्ण होते पण आम्ही M.O. किती वर्णात विभागलो गेलोत!         प्रत्येकजण आपापल्या प्रश्नापुरताच विचार करतो बाकीचा प्रश्नचा विचार सुध्दा  त्याला चीड आणतो !!    उघड उघड पोरकटपणे  बोलून सुध्दा दाखवतात . .

    `आम्हाला नको तो NPA OPTIONAL ` अस्थायीचे बोला ,

`अस्थायी चे काय ,होईलच कधी तरी , कामाच्या तासाचे बघा ,` 

`अस्थायी ,NPA ,कामाचे तास काय लावलेय, तेवढे promotion चे बघा,`

`promotion काय, mbbs अस्थायीचे बघा `,

mbbs अस्थायीचे काय, झालेय कि तेवढे, bams चे बघा ,

 `काय लावलाय हे सगळे , आमचे  inservice PG चे काही करता कि नाही,`

`तुम्ही सगळे आपले mo चेच प्रश्न बघताय ते काही नाही आम्ही inservice  pg ला लागलोय आमची fees माफ करून घ्या ,resident एवढे काम नको कारण आमचा NPA कापतात राव तुम्ही हे आधी करा !!`

`OPTIONAL NPA  amendment  GR  तेव्हा पटकन काढून घ्या ,अहो त्या ३ व ६ वेतन वाढीच्या दुरुस्त केलेले GR मध्ये तात्काळ दुरुस्तीकरून घ्या `

`,BACKBENEFIT  चे काय ? `  इ. इ.  

  आणखी तुम्ही हि ह्या यादीत भर घालू शकता !कारण सर्वाना हा आपला भाषाव्यवहार  माहित आहेच .

 ह्या प्रत्येक समस्या महत्वाच्या आहेत सोडवायला हवेतच आणि सोडवल्या जाताहेत प्रक्रियेत आहेत शेवटी शासन ,व्यवस्थेच्या मानगुटीवर बसून काढ gr काढतो कि नाही? असा हि म्हणता येत नाही , त्यांच्या कलाने  ठरवलेल्या प्रक्रीतेतूनच जावे लागते आणि असे हि नाही हे सर्व निर्णय करणारा कोणी १-२ च्या हातात आहेत  त्याना पकडून करून घेऊ ;अनेक विभाग , अनेक अधिकारी, अनेक टेबल , अनेक पदाधिकारी ह्यांच्याकडे  ह्या दस्ताचा  प्रवास होतो. युक्त्याप्रयुक्त्या ,कधी आर्जवे, कधी कायदेशीर बाबीसागून ,मनवून कामे मार्गी लावी लागतात.           

 होऊन जाऊ द्या एकदाचे आर पार!! हे कुणाचे जीवावर म्हणायचे आपण ? संपाची संघर्षाची भाषा करणे खूप सोपे आहे. उतरलात तर प्रत्यक्षात  त्यात पूर्ण लोक सहभागी होतील ? किती दिवस ? 

माझी नोकरी गेली तरी बेहत्तर सगळ्यासाठी मी संपावर ठाम राहीन ,येऊ द्या निलंबनाच्या बडतर्फीच्या मेस्मा ची नोटिशी सरकारच्या कितीही!असे म्हणणारे  किती असतील  M.O ? 

        प्राध्यापका सारखे शेवटी पदरात काहीं न पडलेल्या प्रदीर्घ संपासारखे M O  नौकरी लावतील दुसऱ्यासाठी  पणाला?तीन तीन महिने ? 

   आझाद मैदानात ३ ऱ्या  दिवशीच  संयम  सुटला होता परतीचे तिकिटे बुक होत होती . तशे  १२००० पैकी  भरगच्च म्हटले तरी किती जन होतो आपण सर्वाना म्हाहीत आहे ?ज्यांचा प्रश्न होता त्यातलेच ते काही बेचारे तेवढे दृढ संकल्प घेउन  होते बाकी सगळे गावाकडून टेलिफोनिक बातम्या खबर घेण्यात धन्यता मानत होते!एक तर गुपचूप कामावर तरी अन्यथा आपली दुकानदारी चालवत बसले होते!तीव्र आंदोलन सरकारला नाकी नऊ आणणारे आंदोलन असे  नसते. सरकारचे सौजन्य आणि सर्व वरिष्ठ नवीन धुरीनाची  कुशल मुत्सदीगिरीमुळे काही तरी त्यावेळी पदरात पडले.            

        सध्य परिस्थितीत आपले आंदोलन  किती परिणामकारक होऊ शकते याची कल्पना येण्यासाठी तुम्ही एक साधा प्रयोग करू शकता ,तुम्ही तुमच्याजिल्ह्यात एकूण एक MO,PHC , RH ,SDH ,CH CDs सगळे किती mo हे बघा आणि त्यांना जिल्हयाच्या ठीकाणी सर्वाना एका  फेरीसाठी /धरणे ह्यासाठी  एकाद्या प्रश्नासाठी ,बोलवून घ्या बघा काय प्रतिसाद असतो? 

         एवढे कशाला आठवा  २०11  मध्ये हि किती `टक्के` mo होते जिल्हा स्तरावरच्या धरणात मोर्चात धरणात , फेरीमध्ये, तेव्हाही ?एवढेच काय माग्मोच्या बैठकीला किती लोक असतात हो आपल्या विचार करा.जे आले ते ही  नुसत्या उनेधुने काढण्यात, एकदुसऱ्याचे अहंगड दुखावण्यात किंवा अहं सुखावण्यात धन्यता मानतात.`  ह्याचे काय केले त्याचे काय केले `जणू माग्मो त्यांची काहीच नाही आणि  जिल्ह्याचे  माग्मो पदाधिकारी  त्यांचे वेतनी मुनीम आहेत ! अश्याने एकता कशी येइल. एकजिनसीपणा कसा येईल .               एकाचा पायपोस एकात नाही !

         आंदोलन संप काळात काय अवस्था असते आपली आत्मपरीक्षण करा, किती लोक घरीच बसतात , किती लोक घाबरून चोरून कामावर असतात,किती लोक माझ्या संबधातील मागणी नाही म्हणून संपात येतच  नाहीत, तर किती लोक नुसती नोटीस आली की जीवाच्या आकांताने कामावर सर्वात आधी हजर!.आंदोलनाची  ऐशी की तैशी !! 

      हा संघटना स्थापन झाल्यापासूनचा  सर्व आंदोलनाचा सर्वांचा कटू अनुभव आहे. ज्याचा प्रश्न तीव्र आणि नेहमीच सघटनेत क्रियाशील असणारे  त्यातलेच (तेही सर्व १०० % नाही!)  तेवढेच पोटतिडकीने सहभागी होतात ! ते हि  भीत भीतच ! (होय , भीत भीतच ,कारण सर्वाना संसार आहे मुले बाळं  आहेत, प्रपंचाची मोठी जिम्मेदारी अंगावर आहे त्यात आंदोलनामुळे नोकरीला काही बरेवाईट झाले तर? हि अनामिक भीती असतेच आणि ती असणे काहीं वावगे नाही)      

             गेल्या दिड वर्षात एकूण १३  शासन निर्णय  निघाले त्यात कुणाचातरी फायदा झालाच असेल . पण संघटनेने आपल्यापणाने प्रामाणिकपणे रीतसर पावतीने वर्गणी जमा कार्याचे आह्वान केले होते ,खूप मोठी रक्कम किंवा  अवघड  ओझे नव्हते तरी  आमचा  प्रतीसाद  काय ५%? त्यात मग ह्या एवढ्याच्या  रकमेची सौदेबाजी चालते. ``आधी काम करा मग पैसे घ्या? किंवा वर्गणीचे  पैसे दिलेत अमुक अमुक काम माझे का होत नाहीत ?``वर्गणीचे पैसे त्या कामासाठीचे मुल्य? हे तुत्पिंजी देणगी काही कामाचे हे दाम नव्हे ! आणि असू हि शकत नाही एवढे तरी आपण सर्व सुज्ञ आहोत! .                

                 म्हणून काय आपण हातवार हात  ठेऊन बसायचे का हतबल होऊन ? ह्याचा अर्थ जडत्व अलेल्या व्यवस्थेला अनुकूल करण्यासाठी आंदोलन संघर्ष करायचच नाही का ?  

         नाही , असे बिलकुल नाही! संघर्ष, संपाचे  हत्यार तर योग्यवेळी आवश्यकता  पडल्यास उपसावेच  लागेल;

     जसे महाबळेश्वर पाचगणी च्या भव्य माग्कॉन  च्या शक्ती प्रदर्शन  व बौद्धिक सामोपचाराने हि सरकार अनुकूल होत  नव्हते तेव्हा  आपण संप पुकारालाच होता !!       
  पण आता केंव्हा ? वेळ येईल तेव्हा.  सैन्य जागे करा, civil ,RH  ,PHC ,SDH  असे एकुनेक MO  झाडून प्रत्येकवेळी  उभा राहल्या हवा . प्रत्येकाने प्रयत्न करायला ,तोंड पाटीलकी आणि उंटावरून शेळ्या हकने बस झाले ,तुम लढते रहो  हम कपडे सांभाळते, SORRY हम पीछे अपनी दुकान चलाते है ! हे नाही चालायचे . 

तशी वेळच आली तर पूर्ण ताकदीनिशी  काही करू,तरच काही  शक्य होइल. आत्ता लुटुपुटू च्या आंदोलनाने ,३-३ दिवसाच्या संघर्षानी ,रक्तदान नेत्रदानानी काही नाही होणार कारण आता ते immune झालेत!

 अर्धवट नेभळट पांगलेल्या आंदोलनाने  मग उलट प्रचंड नुकसान होईल ,सरकारला कळून चुकेल कि हि जमत एकसंघ येणार नाही आणि साधी नोटीस दिली तरी नोकरी वाचवण्याच्या भयाने सरळ कामावर हजर होणारे आहेत! ह्यांचे काम नाही केले तरी चालेल हे MO काही ही करू शकत नाही !

भीती हि आहे आणि त्यात तथ्यही आहे! बाबा हि गेल्या आणि दशम्याही गेल्या!तेल गेले तूप गेले हाती राहील धुपाटणे!

 म्हणून हे थोडेसे अंजन!!